सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षेतील फरक धूसर!

12 Feb 2025 14:25:19
 
defence
 
सध्याच्या काळात सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यातील फरक अस्पष्ट होत चालला आहे. शांततेच्या काळातही हायब्रीड युद्धे राष्ट्रीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतात, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. बंगळुरू येथे "ब्रिज-बिल्डिंग रेझिलियन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एंगेजमेंट" या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते.
 
संघर्षांची वाढती संख्या आपल्या जगाला अधिक संवेदनशील बनवत आहे. नवीन शक्तीप्रदर्शने, नवीन पद्धती आणि शस्त्रास्त्रीकरणाचे नवीन मार्ग, गैर-राज्य घटकांची वाढती भूमिका आणि विघटनकारी तंत्रज्ञानामुळे जागतिक व्यवस्था अधिक नाजूक बनली आहे. त्याचबरोबर, सीमा सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यातील फरक अस्पष्ट होत चालला आहे, कारण हायब्रीड युद्ध शांततेच्या काळातही महत्त्वाच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते. त्याचवेळी शिवाय, सायबरस्पेस आणि बाह्य अवकाशाचे परिमाण सार्वभौमत्वाच्या स्थापित व्याख्येला आव्हान देत आहेत. या सर्व आव्हानांचा समग्र आढावा घेण्याची गरज आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
 
संरक्षण मंत्र्यांनी पुढे अधोरेखित केले की भारताने दीर्घकाळापासून समावेशक आणि सहयोगी शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी ही पंचसूत्री भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा आधारस्तंभ आहेत. सध्याच्या विभागलेल्या जगातही ही पंचसूत्री प्रभावी ठरते, असेही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0